Sunday, July 12, 2009

'सह्याद्री' मध्ये मधुमेहासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र

'सह्याद्री' मध्ये मधुमेहासाठी अत्याधुनिक उपचार केंद्र
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 03rd, 2009 AT 11:06 PM

गणेश कला क्रीडा मंच - सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेतील 'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस'चे उद्‌घाटन रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे - मधुमेही रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साह्याने उपचार करण्यासाठी सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेमध्ये 'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस' सुरू करण्यात आले आहे. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ मधुमेह असलेल्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे नुकतेच औपचारिक उद्‌घाटन करण्यात आले.
या प्रसंगी सह्याद्री रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. चारू आपटे, डॉ. जयश्री आपटे, प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. या केंद्राच्या प्रमुख मधुमेह तज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक डॉ. शैलजा काळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्या म्हणाल्या, 'देशातील झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जागृती करणे आवश्‍यक आहे. यासाठी हे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे. आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, ताण आणि आहार ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेहाची शक्‍यता असणाऱ्यांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या केंद्रातर्फे करण्यात येणार आहे. जुना मधुमेह असलेल्या रुग्णांना मूत्रपिंडविकार, हृदयविकार, न्यूमोनिया असे दुष्परिणाम होतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची सुविधा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. मधुमेह प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभागही यात सुरू करण्यात आला आहे.
'मधुमेहामुळे पायाला होणाऱ्या जखमांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत उपकरणे या केंद्रात आहेत. डोळ्यांसाठी स्वतंत्र विभाग आणि अद्ययावत अतिदक्षता विभागही येथे आहे,'' असे त्यांनी सांगितले.
मधुमेहावरील संशोधनही या केंद्रात सुरू आहे. याबाबत माहिती देताना डॉ. काळे म्हणाल्या, 'मधुमेही रुग्णांच्या पायांच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी येथे संशोधन सुरू आहे. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (आयसीएमआर) अंतर्गत मधुमेहींच्या गुणसूत्रांची तपासणी करण्याचेही संशोधन सुरू आहे.''
मोफत तपासणी शिबिर
'सेंटर ऑफ एक्‍सलन्स फॉर डायबेटिस'तर्फे येत्या 10 ते 20 जूनला सह्याद्री रुग्णालयाच्या बिबवेवाडी शाखेत आठशे मधुमेही रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी 9673338063 किंवा 9673338179 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन

फास्ट फूड आणि आहाराचे असंतुलन
Saturday, June 06th, 2009 AT 12:06 PM


आजकाल हॉटेलिंग करणे ही चैनीची किंवा नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. आबालवृद्धांपासून सगळ्याच वयोगटातील लोक या गोष्टीस सरावलेले आहेत. फास्ट फूड आवडणाऱ्यांचा एक नवीन गट तयार झाला आहे. कदाचित कित्येकांनी आपला समतोल आहार सोडून दिनक्रमात त्याचा समावेश केला आहे. ही परिस्थिती थोड्याफार फरकाने घरोघरी आढळते. अशी ही फास्ट फूड सर्व्ह करणारी सेंटर्स आता कानाकोपऱ्यात आढळतात. याला कारण म्हणजे, या पदार्थांची "रेडी टू सर्व्ह' अशी जाहिरात केली जाते. मधल्या वेळचे खाणे किंवा मुलांचे टिफिन किंवा मुख्य जेवणाला पर्याय म्हणूनही या पदार्थांकडे पाहिले जाते. हे फास्ट फूड कशाचे बनलेले असते, ते आरोग्यवर्धक आहे का, हे प्रश्‍न नक्कीच उपस्थित करावेत असे वाटते.
फास्ट फूड हे प्रामुख्यानी प्राणिजन्य स्निग्ध पदार्थ (चीज, चरबी, खारवलेले लोणी), मीठ, साखर, अजिनोमोटो, रिफाइंड फ्लोअरपासून बनलेले असतात. यात अतिशय आवडीने खाण्यात येणारे पदार्थ म्हणजे नूडल्स, बर्गर, पिझ्झा, ब्रेड, बन इ. या पदार्थांसोबत शीतपेये घेतली जातात. यातून रिकामे उष्मांक शरीराला मिळतात. तसेच ही सवय लहानपणापासून लागली तर ती एकच चव मुलांना आवडायला लागते.
विशेष करून 5 ते 15 वयोगटातील मुलांसाठी हा प्रश्‍न गंभीर स्वरूप धारण करू शकतो. वाढीच्या वयातील चुकीचे खाणे या मुलांना त्रासदायक ठरू शकते. फास्ट फूड हे प्रामुख्याने रिफाइंड पदार्थांपासून बनलेले असतात. यात कोंडा (आहारातील एक आवश्‍यक घटक) नसतो. या पदार्थांमध्ये स्निग्धांम्लांचा अतिरेकी वापर केला जातो. यात भाज्या, फळे, सालीयुक्त डाळी, कोंडायुक्त धान्याचे पीठ यांचा वापर केलेला नसतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशात जिथे भाज्या, फळफळावळ भरपूर प्रमाणात पिकविले जाते, अशा ठिकाणी या पदार्थांची चलती व्हावी, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे.
या सदोष आहारपद्धतीचे फलित म्हणजे अनावश्‍यक वाढणारे वजन, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, आतड्याचे रोग, पोटाचे विकार इ. व्याधींना आमंत्रण देणारे घटक या आहारात भरपूर प्रमाणात असतात. पौष्टिकतेला लागणारा समतोलपणाचा अभाव असल्यामुळे असा आहार आरोग्यवर्धक होऊ शकत नाही. यातील प्राणिजन्य मेदामुळे हृदयरोग, मधुमेह, अनावश्‍यक वाढणारे वजन इ. व्याधी उद्‌भवू शकतात. यातील मिठाचे प्रमाण अतिरिक्त रक्तदाबाला आमंत्रण देणारे ठरू शकते. या आहारातील कोंड्याच्या अभावी आतड्याची दुखणी, कर्करोग, पचनशक्तीवर परिणाम होऊ शकतो. तसेच जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हे रोग गंभीर रूप धारण करू शकतात. हा धोका टाळायचा असेल तर आहारपद्धतीत सुधारणा करणे जरुरीचे आहे.
फास्ट फूड हे लोण पाश्‍चात्त्य देशांतून आलेले असले तरी अमेरिकन सरकारपुढे आलेल्या वैद्यकीय रिपोर्टवरून अमेरिकेत हृदयरोग, आतड्याचे रोग, मधुमेह, कर्करोग यांसारख्या रोगांमुळे आलेले मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हे रोग आणि आहार यांचा निकटचा संबंध आहे.
अमेरिकन सरकारने याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आहार कसा असावा याबाबत प्रसार केला. भारतातही अशाप्रकारे काही मोहीम राबविण्याची गरज आहे असे वाटते. नाही तर चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून व्याधिग्रस्त पुढची पिढी तयार व्हायला वेळ लागणार नाही. आहारात होत असलेला हा बदल चांगला नसून वाईट आहे, हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
दारिद्य्ररेषेखालील लोकांना परिस्थितीअभावी कुपोषण आहे, तर सधन वर्गात "खाऊन-पिऊन उपाशी' असा एक वर्ग चुकीच्या आहारापद्धतीमुळे व आहाराविषयक अज्ञानामुळे फोफावतो आहे. आधीच अनेक प्रक्रिया केलेले अन्न आपल्यापर्यंत पोचते. त्यात चुकीच्या आहारपद्धतीचे फलित म्हणून आरोग्याच्या समस्या उद्‌भवण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येकाने आपला आहार तपासून पाहणे आता निकडीचे झाले आहे.
- मृणाल सुरंगळीकर
(आहारतज्ज्ञ, नागपूर)

जोडगोळी रक्तदाब आणि मधुमेहाची!

जोडगोळी रक्तदाब आणि मधुमेहाची!
Thursday, June 11th, 2009 AT 12:06 PM


रक्तदाब आणि मधुमेह हे दोन शब्द असे आहेत, की जे ऐकलं तरी पोटात गोळा उभा राहतो. त्यातच हे दोन्ही आजार असले, तर काही खैर नाही, असा समजही असतो. किंबहुना म्हणूनही असेल कदाचित; पण या दोन्ही रोगांविषयी अनेक समज-गैरसमज दिसून येतात. त्यापैकी काहींची झलक प्रथम पाहूया.
एखादी व्यक्ती नर्व्हस किंवा हायपर ऍक्‍टिव्ह झाली, तर तर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, असं मानलं जातं; पण ते तसं नसतं. मधुमेह बरा करता येणं ही गोष्ट अशक्‍य असली तरी तो नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. तसंच रक्तदाबाचंही आहे. नियमित आहार आणि व्यायामामुळे रक्तदाबही आटोक्‍यात ठेवता येऊ शकतो; शिवाय आपली जीवनशैली बदलून रक्तदाब आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
रक्तदाबाचा विकार किंवा मधुमेह बरा होऊ शकतो, अशातला भाग नाही; पण काही उपायांमुळे हे विकार नियंत्रणात येण्यासाठी मदत होऊ शकते. ते उपाय आहेत तरी कोणते?
* वजन प्रमाणाबाहेर वाढलं असेल, तर ते नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा.
* घरच्या घरी किंवा जिममध्ये जाऊन नियमितपणे व्यायाम केलात, तर आपोआपच वजनाचा काटा योग्य आकड्यावर स्थिरावेल.
* आपला आहार समतोल राहील आणि तो वेळच्या वेळी घेता येईल, याची काळजी घ्यायला हवी. आपल्या आरोग्याला आवश्‍यक असणाऱ्या आहाराचा तक्ता आपल्या डॉक्‍टरांकडून किंवा आहारतज्ज्ञांकडून आखून घ्यावा.
* कोलेस्ट्रॉलवरचं नियंत्रण, मीठ कमी खाणं यामुळे फिजिकली ऍक्‍टिव्ह राहता येतं.
* अतिरिक्त मद्यपान करू नका.
* डॉक्‍टरांनी सांगितलेल्या औषधांचं नियमितपणे सेवन करा.
* मधुमेहाचा त्रास होत असेल, तर नियमित व्यायाम आणि योग्य आहाराचा समतोल राखायला हवा.
* व्यायाम केल्यामुळे शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण कमी राहायला मदत होऊ शकेल.
* आवश्‍यकतेनुसार इन्शुलिन आणि ग्लुकोजचा वापर जरूर करावा.
* डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार अतिरिक्त वजनावर नियंत्रण ठेवायला हवं.
* नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण वाढण्यास मदतच होते.
* ऍरोबिक्‍ससारख्या ऍक्‍टिव्हिटीज केल्यानं हृदयाची क्षमता वाढते.
* नियामित व्यायाम केल्यानं बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढते आणि परफॉर्मन्स चांगला होतो.
* हलकं वर्कआऊट केल्यानं शरीरातल्या ग्लुकोजचा योग्य रीतीनं वापर केला जातो.
* मधुमेही असणाऱ्यांनी कर्बोदक असलेले पदार्थ खाणं टाळावं.
मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना काही बाबी आठवणीनं आणि अगदी दक्षतेनं करणं गरजेचं असतं. नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिमला जात असाल, तर ती चांगलीच गोष्ट आहे; पण जिममध्ये जाऊन व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला अवश्‍य घ्यावा. तसंच जिम इन्स्ट्रक्‍टरलाही आपल्या आजाराची कल्पना दिली, की तो त्यानुसार व्यायाम प्रकार सांगू शकेल.
व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी आणि नंतर रक्तातल्या साखरेचं प्रमाण तपासून घ्यावं. लो इन्टेसिटीचे वर्कआऊट ट्राय करता येतील. व्यायाम करताना वर्कअप एक्‍सरसाइज करणं अनिवार्य ठरतं. व्यायामाला प्रारंभ करताना सुरुवातीलाच एकदम अवघड व्यायामप्रकार न करता सोपेसे व्यायामप्रकार आधी शिकून घ्या.
असलेल्यांच्या पावलांपर्यंत रक्ताभिसरण नीट होत नाही, अशी तक्रार कायम असते. व्यायाम केल्यानं ते सुरळीत होऊ शकतं. व्यायाम करताना किंवा करून झाल्यावर अशक्तपणा जाणवत असेल तर किंवा श्‍वास घ्यायला त्रास होत असेल, तर अतिव्यायाम करणं किंवा मनावर ताण घेण्याचं टाळावं. आपली औषधं नियमितपणे आणि न चुकता घ्यावीत. कदाचित औषधं वेळेवर न घेण्यानंही हे दुष्परिणाम होऊ शकतात.
जिममध्ये जाणं जमत नसेल, तर घरच्या घरीच मात्र रोजच्या रोज व्यायाम करता येईल. तेही शक्‍य नसेल, तर मोकळ्या हवेत किंवा पार्कात फिरायला जा. हृदयावर अतिरिक्त ताण येईल एवढा व्यायाम अजिबात करू नका. व्यायाम केल्यावर नाडीचे ठोके नियमित व्हायला मदत होण्यासाठी कूलिंग डाऊन एक्‍सरसाइज करणं अतिशय गरजेचं आहे.
तेव्हा रक्तदाब आणि मधुमेह टाळण्यासाठी योग्य ते आहार-विहार व व्यायाम करा आणि सुदृढ व्हा.
- आभा नवरे

स्त्रियांमधील मधुमेह

स्त्रियांमधील मधुमेह
Monday, March 16th, 2009 AT 11:03 AM


भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।'' असा सार्थ गौरव पुराणामध्ये सापडतो. शहराची प्रमुख ही स्त्री असावी, कारण स्त्री जशी घराची धुरा समर्थपणे सांभाळते त्याचप्रमाणे शहराची काळजी ती घेऊ शकेल, अशी त्यामागे संकल्पना होती. अर्थात, हा वेदकालीन संदर्भ आहे.
घर सांभाळताना स्त्री ज्या निगुतीने हे कार्य करते, तसेच कार्य शहराची/नगराची काळजी घेताना ती करील, अशी भावना त्यामागे होती. वेदांमध्ये गार्गी, अपाला इत्यादी विदुषींची सूक्ते आहेत, म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्याही स्त्री त्या काळी बरीच प्रगत होती.
मात्र हा ताळमेळ पुढे कोठेतरी चुकत गेला. पुरुषप्रधानता वाढीला लागली, अर्थात त्यालाही एक कारण होते. निसर्गतः पुरुषांमध्ये जास्त शक्ती असते. त्यामुळे "बळी तो कान पिळी'' या उक्तीनुसार हे सर्व घडत गेले असावे, असे वाटते. स्त्रियांवरील अत्याचार वाढत गेले. अनिष्ट प्रथांमध्ये त्यांना गुरफटून त्यांचा आत्मविश्‍वास कमी केला गेला. त्या स्वत्व हरवून गेल्याने दुर्बल बनल्या, अबला बनल्या; पण आज ही परिस्थिती बदलते आहे.
शिक्षणाने स्त्रियांना एक सामाजिक दर्जा मिळवून दिला. आज कित्येक स्त्रिया या नोकरी किंवा उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत. मात्र नोकरी करणे, घर सांभाळणे, ही तारेवरची कसरत करताना स्त्री ही अनेक रोगांना सामोरी जाताना दिसतेय. मानसिक तणाव, पीसीओडी, उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे अगदी सातत्याने आढळणारे विकार आपल्याला दिसतात. आज आपण मधुमेह आणि त्यामुळे होणारी मानसिक स्थित्यंतरे याबाबत पाहणार आहेत.
इन्शुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणे, यालाच मधुमेह म्हणतात. बैठे काम, धावपळ, मानसिक उलघाल, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या अयोग्य पद्धती... यामुळे मधुमेहाचे प्रमाण आज खूपच वाढले आहे. पूर्वी म्हणजेच आयुर्वेदकाळात स्त्रियांची मासिकपाळी चालू असेपर्यंत तरी मधुमेह होत नाही, असे एक मत होते. मात्र बाराव्या शतकात आचार्य डल्हण (एक आयुर्वेदतज्ज्ञ आणि सुश्रुतसंहितेचा टीकाकार) यांनी मात्र हे मत खोडून काढले. कारण देताना त्यांनी प्रत्यक्ष प्रमाणाने हे सिद्ध करता येत नसल्याचे सांगितले. याचा अर्थ त्या काळीसुद्धा स्त्रियांना मधुमेह होत होताच; पण त्याचे प्रमाण आजच्या एवढे गंभीर नसावे.
मधुमेहामुळे पूर्ण दिनचर्या, आहार-विहार बदलणे भाग पडते. अशा वेळी आहार-विहार व दिनचर्या याबद्दल परिपूर्ण माहिती डॉक्‍टरांकडून किंवा इंटरनेटसारख्या माध्यमातून मिळवून आपल्यात सुयोग्य बदल घडवायला हवेत. नवीन मधुमेहींना एक चिंता सुरवातीचे काही महिने सतावत असते. एकदा का अंगवळणी ती गोष्ट पडली, की मग मात्र त्या आजाराचे फारसे काही वाटत नाही. सुरवातीला झोप उडते. अशा वेळी मेडिटेशन, योग-व्यायाम करावेत.
साधारणपणे 35 वर्षे ते 40 वर्षांनंतर होणारा मधुमेह हा "टाईप-टू'' या प्रकारचा असतो. त्यामुळे चुकीचा आहार-विहार, शरीराचे योग्य वजन न ठेवणे, व्यायाम न करणे इत्यादी स्वतःचेच दोष त्याला कारणीभूत असतात. या वेळी स्त्रियांनी आरोग्यासाठी उत्तम काय, व्यायाम कसा व कोणता करावा, याविषयी तज्ज्ञ मंडळींकडून जाणून घ्यावे. वजन सुयोग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा.
मधुमेहाला कधीच अनुल्लेखाने मारू नका. हा एक दीर्घकालीन घातक परिणामांचा विकार आहे. त्वरित असे काहीच नुकसान यापासून होत नाही. मात्र कालांतराने खूप त्रासदायक ठरणारा हा विकार आहे. सुयोग्य आहार-विहार आणि नियमित तपासण्या केल्या व औषधोपचार घेतले तर मधुमेहामुळे जीवनातील गोडी कमी होणार नाही.
मानसिकदृष्ट्या खचल्याची तीव्र भावना बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप काळ टिकून राहते. यालाच "डिप्रेशन' असे म्हणतात. या आजारात झोप कमी होते, चिडचिड होते, निर्णयक्षमता कमी होते, खाण्यात आणि विचारात अनेक बदल होतात, वृत्तीत बदल होतात, स्वभाव रुक्ष आणि कोरडा बनतो.
जीवन निरर्थक वाटू लागते. काही वेळा ही अवस्था काही दिवसांची असते, तर काही वेळा कित्येक महिन्यांपर्यंत चालणारीसुद्धा असू शकते. मधुमेही व्यक्ती मानसिक रोगांना जास्त बळी पडतात, असे आढळून आले आहे. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही काळापुरते तरी काउन्सिलिंग व औषधोपचाराने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण डिप्रेशनमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत बरेच बदल होतात. अर्थात ते शरीराला अपायकारकच ठरतात.
मधुमेहामुळे स्त्रियांच्या योनिमार्गात कोरडेपणा येतो. दीर्घकालीन मधुमेह असल्यास योनिदाह होतो. श्‍वेतस्रावाची तक्रार तर कित्येक स्त्रिया करताना आढळतात. योनिमार्गामध्ये खाज उठणे किंवा फंगल इन्फेक्‍शन या अगदी नियमित आढळणाऱ्या घटना बनतात. त्याकरिता स्त्रियांनी मधुमेहाची योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. मूत्रमार्गाचे संसर्ग योग्य औषध घेऊन त्वरित बरे करून घ्यावेत. चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. जेवणात मीठ कमी वापरावे, कारण मधुमेहाच्या सोबतीने उच्चरक्तदाब (ब्लडप्रेशर) व हृदयविकार हे येणारच!
थोडक्‍यात, मधुमेह होऊ नये म्हणून सतर्क असावेच; पण झालाच तर दुर्लक्ष न करता तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करावेत. काही स्त्रिया आयुर्वेदिक औषध घेणे पसंत करतात. अशांसाठी "यसाका'सारखी चांगली आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत. पूर्णतः वनस्पतींपासून बनवलेले "यसाका' हे द्रवरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे.
"यसाका''मुळे पचनशक्ती सुधारते. इन्शुलिनचे कार्य कसदारपणे होते. रक्तशुद्धीकरण होते व मलबद्धता दूर होते. पर्यायाने रक्तातील साखरेवर नियंत्रण येते. थोडक्‍यात, आजच्या जागतिक महिलादिनी रक्तातील अति गोडवा स्त्रियांचे जीवन कडवट बनवू नये, अशी धन्वंतरीला प्रार्थना करू या!
- डॉ. धनंजय प्रभुदेसाई, सिमंधर हर्बल, प्रा. लि.

मधुमेह टाळता येतो ?

मधुमेह टाळता येतो ?
Friday, June 05th, 2009 AT 10:06 AM


आहार आणि व्यायाम यांच्या साह्याने मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

कोणताही आजार हा होण्यापेक्षा जर टाळता आला तर? किंवा त्याचा प्रतबंध करता आला तर? मधुमेह हा आजार म्हणजे नुसतेच रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते असे नव्हे, तर हा आजार व्यक्तीचे शरीर पोखरून, चुंबकासारखे कार्य करतो व विविध आजारांना निमंत्रित करतो. उदा.- उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंडाचे रोग, न बरी होणारी जखम (Gangrene) इ. या आजाराची भीती बाळगण्यापेक्षा आणि तो आपणास होऊन शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाची वाट पाहण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केला तर?
होय, शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे, की तुम्ही मधुमेह टाळू शकता किंवा त्याचा प्रतिबंध करू शकता.
प्रतिबंध कसा करता येईल, हे पाहण्याआधी आपण मधुमेह होण्याची शक्‍यता कोणाकोणास आहे हे विचारात घेऊ.
आपल्या कुटुंबात मधुमेहाचा रुग्ण आहे. उदा.- आपली आई किंवा वडील किंवा दोघेही अथवा आपल्या कमरेचा घेर ८० सें.मी. (महिला) किंवा ९० सें.मी. (पुरुष) पेक्षा जास्त आहे. अथवा आपल्या व्यवसायाचे स्वरूप बैठ्या पद्धतीचे आहे अथवा आपले वय वर्षे ३५ पेक्षा जास्त आहे. असे असल्यास त्या व्यक्तीस मधुमेह होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा व्यक्तींनी स्वतःहून तपासणी करून घेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा. भविष्यात मधुमेह होण्याची शक्‍यता असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पाहण्यापेक्षा, शरीर साखरेचा भार (लोड) सहन करू शकते किंवा नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे (Glucose Tolerance Test) - जेणेकरून ती व्यक्ती मधुमेही (Diabetic)आहे की मधुमेहाच्या पूर्वस्थितीत (Pre-diabetic)आहे हे जाणता येते.
मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील (Pre-diabetic) व्यक्तींनी नियंत्रित आहार व नियमित व्यायाम (Life Style Modification) -केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास व पूर्ववत येण्यासही मदत होते व मधुमेहाचा प्रतिबंध होतो. आहार व व्यायाम हे दोन्ही मधुमेहाच्या उपचारासाठीचे व प्रतबंधात्मक उपायासाठीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. नियंत्रित आहार म्हणजे काय? महाराष्ट्रीय मध्यमवर्गाचा आहार समतोल असला, तरी नियंत्रित नसतो. त्यास नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. दिवसाचा पूर्ण आहार हा चार भागांत विभागून (सकाळचा नाश्‍ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी नाश्‍ता व रात्रीचे जेवण) घेतला पाहिजे.
आहाराच्या चारही भागांपैकी कोणताही भाग कमी केला अथवा टाळला जाऊ नये. बाह्य पदार्थाचे (fast food उदा.- पिझ्झा, बर्गर, वडा-पाव इ.) सेवन टाळावे. खाद्यतेलाचे सेवन मर्यादित स्वरूपात व मिश्रण करून केले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो इत्यादीचा वापर जास्त प्रमाणात करावा.
रात्रीचे जेवण व झोप यामध्ये किमान २-३ तासांचे अंतर असावे. अतिसेवन व कडकडीत उपवास- दोन्हीही टाळावे. आहारामुळे मिळालेल्या ऊर्जेचा (calories) योग्य वापर हा नियमित व्यायामामुळे होतो. व्यायाम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. घरकाम, बागकाम, कार्यालयीन काम यामध्ये खर्च होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करणे गरजेचे असते. भरभर चालणे, पोहणे, योगासने, मैदानी खेळ (वैद्यकीय सल्ल्यानंतर) या प्रकारांनी हे साध्य होऊ शकते. नियमित व्यायाम हा दिवसातून ३०-४५ मिनिटे व आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा करायला हवा.
नियंत्रित आहार व नियमित व्यायामाचे फायदे- वजन नियंत्रित राहते, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. नियंत्रित आहार व नियमित व्यायाम या जीवनशैली बदलामुळे (Life-style modification) मधुमेहाचा प्रतिबंध होऊ शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात जीवनशैली बदलणे अवघड आहे, पण अशक्‍यप्राय नाही. जीवनशैली बदलरूपी लसीने मधुमेहाचा प्रतिबंध करता येतो. दुर्दैवाने कोणत्याही औषधीनिर्मिती कंपनीला ही लस बनवता येत नाही, म्हणून ही लस आजच सर्वांनी स्वतःहून घेतली पाहिजे व मधुमेह झाल्यानंतर त्याच्याशी लढा देण्यापेक्षा मधुमेह होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक लढा दिला पाहिजे.
- डॉ. अभिजित मुगळीकर, मधुमेहतज्ज्ञ, लातूर

लान्टस इंसुलिन और कैंसर पर अध्ययन के बारे में

लान्टस इंसुलिन और कैंसर पर अध्ययन के बारे में अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी का राय
रविवार को 5 जुलाई, 2009
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी जोखिम अध्ययन
रविवार को 5 जुलाई, 2009
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी रोगियों के लिए एक लेख जारी किए हैं

हाल ही में वहाँ जर्मनी से एक अध्ययन किया गया
यह दिखाया की लान्टस का उपयोग करने वाले लोगों में कानसर का होने का कतरा अधिक है
अमेरिकन एन्दोक्किन सोसायटी की राय है की
जर्मन समाज कि इस अध्ययन अधूरी है.
हाल के यह चार अन्य अध्ययनों से समझा.
वे लान्टस और कैंसर के खतरे के बीच एक रिश्ता नहीं दिखा था.

इस लेख कहती है

"इस एन्दोक्किन समाज और हार्मोन फाउंडेशन,
एन्दोक्किन सोसायटी से जो जन शिक्षा के लिए सम्बद्ध है.
रोगियों को उनके वर्तमान इंसुलिन थेरेपी से जारी रखनेका सलाह देती है

जब तक वे अपने चिकित्सकों के साथ एक विशेष इन्सुलिन उपचार क्यों निर्धारित था.इन कारणों के बारे में चर्चा नहीं करते है और उनके सही राइ जान थे है .
सके अलावा,
मधुमेह के रोगियों को अन्य सभी व्यक्तियों, जैसे
कैंसर का जल्दी पता लगाने के लिए जो स्क्रीनिंग प्रक्रिया का सिफ्रासें है उनका पालन करना चाहिए
आवधिक मैमोग्राफी और कोलोनोस्कोपी ऐसे, कार्रवाई का पालन करके कानसर से बचना चाहिये .
और ऐसे आदथाने जो कानसर पैदा करनेके साथ जुडी हिई है जैसे के धूम्रपान,तम्बाकू का इस्तेमाल ,ज्यादा फाट खाना इनसे दूर रहन्ना चाहिये .
और जब तक की लान्टस और कानसर का सम्बन्ध के बारे में विशेष जान कारी नहीं मिलती
जल्दबाजी में उसका उपयोग करने से रुकावट नहीं डालनी चाहिए

पूरा लेख, इस लिंक का अनुसरण करें पढ़ने के लिए ...

* अनुशंसाएँ मरीजों के लिए Endocrine सोसायटी Lantus ® (इन्सुलिन Glargine) और कैंसर से - 2 जुलाई, 2009

http://www.endo-society.org/advocacy/policy/upload/Statement-for-Patients-on-Insulin-Glargine.pdf

Thursday, July 09, 2009

Have fun with machine translation

although machine translation atleast lets us get a jist of the matter from webpages written in many languages in which we are not proficient sometimes they are so much jibberish for the person who knows the languages and sound really funny
for example

"मधुमेह पर-Diets.net, हम डायबिटीज़ के मरीज़ों के लिए एक विशेष आहार होने के महत्व पर जोर देता है. क्या वास्तव में एक "मधुमेह आहार" क्या है? जब ज्यादातर लोग इस शब्द की "आहार," वे कुछ लोकप्रिय आहार कि उनके दोस्त हैं, यह Atkins आहार या गोभी का शोरबा आहार जैसे प्रयास किया है सकते हैं के बारे में सोच है. ताकि जल्दी से अपना वजन कम आहार जैसे ये आमतौर पर कि dieter कुछ काफी (जैसे कठोर हो की आवश्यकता है केवल एक का चयन कुछ खाद्य पदार्थ) खाते हैं.
वजन इन के रूप में हानि आहार ऐसे ही खतरनाक नहीं है, लेकिन किसी को भी लंबे समय में उनके अतिरिक्त भार दूर रखने में मदद की उम्मीद नहीं कर रहे हैं.
मधुमेह आहार प्रियसिद्धांत वजन-नुकसान आहार से संबंधित नहीं हैं. "आहार" वास्तव में सिर्फ खाना है कि एक व्यक्ति को प्रत्येक दिन खाती का उल्लेख शब्द. कौन खा रहा है कि दुनिया में हर कोई एक आहार पर है! आश्चर्य की बात की अवधारणा दरअसल, it'sa तरह. "
"